नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) बाबत विरोधी पक्षांकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशभरात एनआरसी लागू करण्यात येईल आणि अधारच्या आधारे नागरिकाची ओळख करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. तर एनआरसीमध्ये धर्माच्या आधारे भेदभाव होण्याची शक्यता फेटाळून लावत ‘कोणत्याही धर्माच्या लोकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेत एनआरसीवर चर्चा सुरू असताना अमित शहा यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘ही एक प्रक्रिया असून याद्वारे देशातील सर्व नागरिक एनआरसी यादीत सहभागी होऊ शकणार आहेत. एनआरसीमध्ये धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. एखाद्या धर्माच्या नागरिकाला एनआरसीमध्ये सहभागी केले जाणार नाही, असे काही नाही. कोणताही धर्म असलेल्या नागरिकांना यामध्ये सहभागी केले जाईल.’ तसेच एनआरसी आणि नागरिकता संशोधन विधेयक या वेगळ्या प्रक्रिया असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Home Minister Amit Shah in Rajya Sabha: NRC has no such provision which says that no other religion will be taken under NRC. All citizens of India irrespective of religion will figure in the NRC list. The NRC is different from Citizenship Amendment Bill https://t.co/vYMnH9SKQL
— ANI (@ANI) November 20, 2019